तपोभूमी
श्री सिद्धारुढ आश्रम

“।। गुरू वचन प्रतिपालन हेंचि शिष्याचे मुख्य लक्षण ।।” हे समर्थ रामदासांचे ‘दासबोधातील’ वचन सार्थ करीत जगदगुरू श्री सिद्धारूढ महास्वामीजी व परम श्रद्धेय श्री शिवकुमार स्वामीजींच्या कृपापात्र परम शिष्या परम पूज्य सु. श्री. मनीषा दिदीजींनी सदगुरूं प्रेरणेने २०१० साली प्रेम भक्ति साधना केंद्राची स्थापना केली. महाराष्ट्र व गोवा येथे ठिक-ठिकाणी सत्संग केंद्र स्थापन करून साप्ताहिक साधना व ध्यान शिबीर प्रारंभ केले.
२०१३-१४ साली कळवण तालुक्यातील निवाणे या छोट्याश्या गावात सत्संगातील सहहृदय भाविकांनी भूमी दान केले व प्रेम भक्ति – श्री सिद्धारूढ आश्रमची, स्थापना सदगुरू प्रेरणेने झाली. प्रथमतः फक्त गवताची कुटी बांधुन दिदीजीं नी ह्या परिसरात ध्यान साधनेला सुरुवात केली. साधनेची अध्यात्मिक शक्ती व सदगुरू चरणांची अतूट श्रद्धा या दैवी संपत्तीच्या आधारे सदगुरू कृपेचा अनुभव परम पूज्य दिदीजींनी समस्त सदभक्तांना प्राप्त करवून दिला. हळूहळू सदगुरू कृपेचा अनुभव पंचक्रोशीतील सदभक्तांना येऊ लागला आणि कळत नकळत ते आश्रमाशी जोडले गेले त्यांच्या भौतिक भोगवादी जीवनाला दिशा प्राप्त झाली. आश्रमात सत्संग साधनेद्वारे शुद्ध आचार व विचाराच्या पलनामुळे येणाऱ्या प्रत्येक जीवाला जडत्वातून चैतन्याकडे जाण्याचा मार्ग प्राप्त होत आहे. आश्रमात येणारा प्रत्येक भक्त परमानंद व परमशांतीचा अनुभव घेऊ लागला. हे जीवन परिवर्तन बघुन सदगुरू भक्तिचे स्थायी रूप प्राप्त व्हावे ही तळमळ दिदीजींच्या व सदभक्तांच्या मनात जाणवू लागली. त्यानंतर दिदीजींच्या अथक परिश्रमातून परम पूज्य सदगुरू श्री शिवकुमार स्वामीजी यांच्या आशीर्वादाने आणि शुभहस्ते श्री गणेश, भगवती राजराजेश्वरी माता, स्वयंभु श्री नर्मदेश्वर शिवलिंग या देवी देवतांसहित परम सदगुरू श्री सिद्धारूढ महास्वामीजी याच्या भव्य मंदिराचे भूमिपूजन मे २०१९ मध्ये सम्पन्न झाले. केवळ ७ महिन्यांत १०८ गावांमध्ये सर्व सदभक्तांना सहभागी करून दिदीजींनी विधिवत झोळी फिरवत भिक्षा मागितली आणि मंदिराची निर्मिती केली. फेब्रुवारी २०२० मध्ये सर्व सदभक्तांच्या आणि संत महंताच्या दिव्य सानिध्यात प्राणप्रतिष्ठा महोत्सव संपन्न झाला. दिव्य दंडकारण्य, निसर्गरम्य तपोभूमी व वृक्षवेली यांनी नटलेल्या या परिसराला दिव्यता प्राप्त झाली. नित्य सत्संग साधना, जप, ध्यान, अनुष्ठान यांद्वारे प्रापंचिक जीवनाकडून पारमार्थिक जीवनाकडे वळवून परमानंदाची प्राप्ती आश्रमाद्वारे होत आहे. प्रेम भक्ति साधना केंद्रात दिदीजीं च्या मार्गदर्शनाखाली सनातन वैदिक धर्म संस्कृतीचा प्रचार व प्रसार, रुद्रभिषेक, ध्यान शिबीर, सदगुरू चरित्र ग्रंथ पारायण, बालसंस्कार केंद्र, वृक्ष संवर्धन इत्यादी कार्यक्रम उत्सव आदीद्वारे नवीन, तरुण पिढीला योग्य दिशा देण्याचे महान कार्य सुरू आहे. आज असंख्य भक्तगण मोक्षच्या मार्गावर वाटचाल करीत आहेत. आश्रमात येताच क्षणी प्रत्येक जीव परम शांतीचा अनुभव घेऊन धन्य होतो व गुरू चरणांशी सहज नतमस्तक होतो.

अनंत विभूषित श्री सिद्धारूढ महास्वामीजी
ॐ नमः शिवाय
श्रीगुरु परमात्मने नमः
परम शिवावतारी परपूज्य सदगुरु श्री सिद्धारूढ महास्वामीजी ह्यांचा जन्म चैत्र शुद्ध नवमी ह्या शुभदिनी कर्नाटकतील वंशदुर्ग चालकापूर येथे १८३६ साली झाला.
बालवयापासूनच बाललीलाद्वारे त्यांनी अदभूत अध्यात्मिक शक्तीचा परिचय सामान्य जनांना करवून दिला. जन्मतःच सिद्ध महात्मा असूनही सर्व सामान्य जीवांना बोध देण्यासाठी सदगुरु शोधार्थ त्यांनी बालवयातच गृहत्याग केला.
कर्नाटकतील भुपूर क्षेत्री गजदंड सदगुरूंना शरण गेले. गुरुचरणांची अतुट श्रद्धा व भक्ति हृदयात जागवून त्यांनी अखंड बारा वर्षे सदगुरूंची सेवा केली. त्यांचे समर्पण व ज्ञान यांचा परिचय झाल्यावर गजदंड स्वामीजींनी त्यांना आरुढ पदवी बहाल केली. प्राप्त झालेले आत्मज्ञान सामान्य जनानांपर्यंत पोहोचविण्यासाठी, जगत् उद्धरासाठी सदगुरू श्री गजदंड स्वामीजींनी त्यांना भारत भ्रमण करण्याची आज्ञा दिली, त्यानुसार अखंड, अविरत भ्रमण करून सदगुरू श्री सिद्धारूढ महास्वामीजींनी मुमुक्षु जिवांशी आत्मचर्चा करून ध्यानज्योत प्रगट केली. समाजातील दुःखी, कष्टी, रोगी आणि दरिद्री जिवांना त्यांच्या दुःखातून मुक्त केले, आत्मआनंदाची प्राप्ती करून दिली. परमज्ञानी सिद्ध महात्मा असूनही शांती शस्त्र घेऊन दुष्ट, दुर्जन जिवांवरही अपार करुणेचा वर्षाव करून त्यांच्या हृदयात आत्मज्योत
जागविली.
वयाच्या चाळीसाव्या वर्षी सदगुरू श्री सिद्धारूढ महास्वामीजी कर्नाटकातील हुबळी शहरात दाखल झाले. तेथूनच सिद्धारूढ आश्रमाद्वारे अखंडपणे सर्व अज्ञानी जीवांना मुक्त करण्याचे कार्य केले.
अक्कलकोट ची महाराणी, कोल्हापूरचे शाहू महाराज, बडोद्याचे सयाजी गायकवाड इ. सारखे प्रतिष्ठित एकतीस संस्थानांचे संस्थानिक त्यांचे शिष्य होते.
महात्मा गांधी, स्वतंत्र भारत चळवळीचे जनक लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंद ह्या महान विभूतींनी श्री सिद्धारूढ महास्वामीजींचे दर्शन घेऊन त्यांच्याशी आत्माचर्चा करून स्वतःला धन्य मानले.
श्री सिद्धारूढ महास्वामीजी यांनी आजीवन अखंडपणे रोज तीनवेळा आपल्या दैवी, अमृतवाणीने प्रवचन करून अद्वैत वेदांताचा बोध मुमुक्षु जिवांना करवून दिला. "शरीर नश्वर आहे आत्मा अजर अमर आहे", शास्त्र ग्रंथातील हे मुख्य तत्वज्ञान त्यांनी स्वतःच्या जीवनाद्वारे प्रकट केले. वयाच्या ९३ व्या वर्षी १९२९ साली पवित्र श्रावण मासामध्ये हुबळी क्षेत्री त्यांनी शरीरत्याग केला.
श्रद्धा भक्तिने त्यांच्या चरणांची सेवा करणारे सदभक्तगण आजही त्यांच्या कृपेचा वर्षाव प्राप्त करवून घेत जीवन धन्य करीत आहेत.
श्रीगुरुदेव
परम श्रद्धेय पुज्यपाद सदगुरू डॉ. श्री शिवकुमार महास्वामीजी
श्री गुरू प्रमात्मने नमः
अनंत श्री विभूषित परम श्रद्धेय पुज्यपाद सदगुरू श्री शिवकुमार महास्वामीजी यांचा जन्म कार्तिक एकादशी या शुभदिनी कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील पडनूर गावी १९४५ साली झाला.
परम शिवावतारी श्री सिद्धारुढ महास्वामीजी यांच्या स्वप्न दृष्टांतानुसार त्यांना तरुण्यावस्थेतच परम वैराग्य प्राप्त झाले. पुज्यपाद सदगुरू श्री सिद्धरूढ स्वामीजींच्या निर्देशानुसार श्री सिद्धरूढ स्वामींची जन्मभूमी असलेले कर्नाटकातील चालकापुर येथे त्यांनी प्रयाण केले. बिदर वंशदुर्ग येथे श्री चिदंबराश्रम श्री सिद्धरूढ आश्रमाची स्थापना केली. भारतीय वैदिकशास्त्र परंपरेनुसार समग्र ज्ञान प्राप्ती साठी अखंडपणे ११ वर्षे पुण्यनगरी काशी येथे निवास केला. काशी विद्यापीठाने त्यांना "गीतोत्तम, वेदांतचार्य, वेदांतवादी, शिव अद्वैतभूषण" या उपधीं नी त्यांना विभूषित केले. ज्ञान प्राप्तीची त्यांची आंतरिक तळमळ पाहुन त्यांना "विद्यानंद" ही विशेष पदवी त्यांना बहाल केली. अध्यात्मिक ज्ञान साधना समवेत त्यांनी लौकिक ज्ञान प्राप्त करत त्यांनी तत्वज्ञान विषयात M.A. केले. कानडी मातृभाषा असूनहीपुज्यपाद महास्वामीजींचे संस्कृत, मराठी, हिंदि, इंग्रजी इत्यादी भाषांवर प्रभुत्व आहे. दिव्य अलौकिक रूप, ज्ञानपूर्ण अघोती वाणी व शास्त्र ग्रंथातील गहन विषय सोप्या दृष्टांताद्वारे श्रोत्यांना उलगडून सांगण्याची त्यांची शैली यांमुळे परम पूज्य स्वामींच्या प्रवचनाने सदभक्तगण भारावून जातात व सहजपणे अध्यात्मिक जीवनाची प्राप्ती करवून घेतात.
परम श्रद्धेय स्वामीजींनी श्री सिद्धरूढ म्हास्वामीजींची जन्मभूमी चालकापुर येथे भव्य मंदिर निर्माण करून सिद्धारूढ स्वामींच्या जन्मभूमीचा परिचय समस्त सिद्धरूढ भक्तांना करवून दिला. देश विदेशात, गावोगावी श्री सिद्धरूढ आश्रमाची स्थापना करून अद्वैत वेदान्ताचा प्रचार व प्रसार करण्याचे अलौकिक कार्य परम श्रद्धेय स्वामीजी अखंडपणे करीत आहेत. त्या सोबतच मुख्य आश्रम चिदंबराश्रम श्री सिद्धारूढ आश्रम येथे आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, उच्च महाविद्यालय, इंग्रजी व कानडी माध्यमिक शाळा, अनाथ आश्रम, इत्यादी ची निर्मिती करून आश्रमाद्वारे अखंडपणे सेवा कार्य सुरू आहे. त्यांचे वयाची अमृतमहोत्सवी ७५ वर्षे पूर्ण करूनही आजही अज्ञानी जीवाच्या उद्धारासाठी प्रवचनाद्वारे ज्ञानदानाचे नियमितपणे कार्य सुरू आहे.


प्रेममूर्ती परम पूज्य सुश्री मनीषा दिदीजी
परमपूज्य मनीषा दिदीजींचा जन्म नागपुरातील सुसंस्कृत कुटुंबात झाला. त्यांचे संपूर्ण शिक्षण व शिक्षिकेची नोकरी ही नागपुरातील अत्यंत नामवंत विद्यालयात मध्ये झाले.
१९८४-८५ हा काळ त्यांच्या जीवनातला कलाटणी देणारा ठरला. विद्यानंद, वेदांतचार्य, गितोत्तम डॉ श्री शिवकुमार स्वामीजी यांचे प्रथमच नागपुरात आगमन झाले. रामनगर भागातील श्रीराम मंदिरातील वंदनीय स्वामीजींच्या प्रवचनांचा भक्कम प्रभाव दिदीजीं वर पडला आणि मुळात परमार्थाची प्रचंड आवड आणि आकर्षण असलेल्या दिदीजींच्या जीवनाने वेगळे वळण घेतले. परम पूज्य स्वामीजींची जिथे जिथे प्रवचने, शिबिरे व्हायचे तिथे तिथे दिदीजी न चुकता उपस्थित राहू लागल्या आणि आदरणीय स्वामीजींच्या कर्नाटकातील बिदर येथील चिदम्बराश्रमात त्या नियमित जाऊ लागल्या. काही वर्षांनी सदगुरुंच्या कठोर परिक्षेनंतर त्यांनी गुरुसेवा व सदगुरूंच्या कार्याचा प्रचार प्रसार जीवनभर करण्याचे कठोर व्रत स्वीकारले. या पवित्र सेवेत त्यांच्या पालकांची त्यांना योग्य साथ मिळत गेली. आश्रमात सदगुरूंकडून वैदिक शास्त्र तसेच अन्य पूजा विधींचे शिक्षण घेतले आणि मग त्या सदगुरूंच्या कार्याचा प्रचार-प्रसार गोवा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश या राज्यात करू लागल्या. महाराष्ट्रातील नागपूर, अकोला, अमरावती, वर्धा, पुणे, मुंबई, नाशिक, अहमदनगर तसेच मध्यप्रदेशातील भोपाळ, जबलपूर, इंदौर इत्यादी परिसरात त्यांनी कठोरपणे भ्रमण करून सर्व सर्वसामान्याना अध्यात्माची गोडी लावली.
दिदीजींनी सदगुरू प्रेरणेने २०१० साली प्रेम भक्ति साधना केंद्राची स्थापना केली. महाराष्ट्र व गोवा येथे ठिक-ठिकाणी सत्संग केंद्र स्थापन करून साप्ताहिक साधना व ध्यान शिबीर प्रारंभ केले.
२०१३-१४ साली कळवण तालुक्यातील निवाणे छोट्याश्या गावात प्रेम भक्ति साधना केंद्र श्री सिद्धारूढ आश्रमची, स्थापना सदगुरू प्रेरणेने झाली. प्रथमतः फक्त गवताची कुटी बांधुन दिदीजींनी ह्या परिसरात ध्यान साधनेला सुरुवात केली. फेब्रुवारी २०२० मध्ये सर्व सदभक्तांच्या आणि संत महंताच्या दिव्य सानिध्यात परम पूज्य सदगुरू श्री शिवकुमार स्वामीजी यांच्या आशीर्वादाने आणि शुभहस्ते श्री गणेश, भगवती राजराजेश्वरी माता, स्वयंभु श्री नर्मदेश्वर शिवलिंग या देवी देवतांसहित परम सदगुरू श्री सिद्धारूढ महास्वामीजीं च्या भव्य मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा महोत्सव संपन्न झाला.
प्रेम भक्ति साधना केंद्र श्री सिद्धारूढ आश्रमात दिदी जीं च्या मार्गदर्शनाखाली सनातन वैदिक धर्म संस्कृतीचा प्रचार व प्रसार, रुद्रभिषेक, ध्यान शिबीर, सदगुरू चरित्र ग्रंथ पारायण, बालसंस्कार केंद्र, वृक्ष संवर्धन इत्यादी कार्यक्रम उत्सव आदीद्वारे नवीन, तरुण पिढीला योग्य दिशा देण्याचे महान कार्य सुरू आहे.
उद्दिष्टे

भारतीय वैदिक धर्माच्या आधारे प्रापंचिक जीवांना परमार्थाचा मार्ग दाखवणे.

सत्संग व साधनेद्वारे नैतिक मूल्यांचे महत्त्व रुजवणे.

वैदिक शस्त्र ग्रंथानुसार गुरुत्त्वाची अनुभव प्रापंचिक जीवांना करवून देणे.

केवळ भौतिकतेकडे झुकणाऱ्या युवपिढीला अध्यात्मिक साधनेद्वारे शुद्ध सात्विक जीवनाची प्राप्ती करवुन देणे.

मातृशक्तीला धर्म संस्कृतीचा बोध करवून सुजाण पिढी निर्मितीसाठी सुसंस्काराचे दायित्व रुजवणे.
